Sunday, 18 April 2021

वाचन एक गरज - मेधा सतीश कदम * लिप्यांतरकार : सुवर्णा जगताप (बडोदा)

वाचन एक गरज

- मेधा सतीश कदम 

सध्या सतत पालक एकच तक्रार करत असतात, आमची मुले अजिबात वाचत नाहीत. अगदी खरं आहे ते हल्ली मुलांना पुस्तक वाचण्याचा प्रचंड कंटाळा येतो. पण विद्यार्थ्यांनी जर वाचन केलंच नाही तर त्याचे परिणाम लगेच परीक्षेत दिसून येतात. वाचन करायला आळस का करतात मुलं?

वाचन करायला आळस का करतात मुलं? याची काही कारणे अशी आहेत की
...

दूरचित्रवाणी, फेसबूक, व्हॉट्सऍप अशा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अतिरिक्त वापर यामुळे आमच्या मुलांची आकलन क्षमता कमी होते.

लहानपणापासून मूलं आपल्या आई-वडिलांना इतर नातेवाईकांना वाचताना बघत असतील तर अशी मुले ही वाचन करतात, परंतु ज्या घरात वाचन नसतं अशा घरांमधील मुलं वाचत नाहीत कारण मुल स्वभावतः अनुकरणप्रिय असतात.

मुलांना तसेच मोठ्या माणसांना वाचनाची काय गरज आहे?

लहान वयातच जर मुलांना वाचनाची सवय लागली तर नवीन शब्दांमुळे मुलांच्या मेंदूला चालना मिळते नवीन माहितीमुळे त्यांच्या ज्ञानात भर पडते.

वाचनाने आपण बसल्या जागेवरुन जग फिरू शकतो जे अनुभव घेण शक्य नसतं ते आम्ही पुस्तकांच्या माध्यमातून घेऊ शकतो.

आता तुम्ही म्हणाल की, हे तर दूरचित्रवाणी पण करू शकते, खरं आहे पण टीव्ही बघताना आपला मेंदू संथ होतो, तर वाचताना आपण हळूहळू प्रत्येक शब्द समजून वाचत जातो.कधी आपल्याला लेखकाचं मत पटतं तर कधी आपण त्याच्या विरुद्ध मताचे असतो.पण तरीही आपण वाचताना सतत विचार करत असतो ही प्रक्रिया माहितीचा भडीमार करणारी इतर माध्यमे थांबवतात. म्हणूनच इंडिया टुडे चे अरुण पुरी म्हणतात, डोन्ट बिलीव रीडिंग एक्सपिरीयन्स वेल वि रिप्लेस बाय अंड ऑडिओ विज वेल दि पावर ऑफ रीड न वर्ड विल बी सुप्रीम. वाचनाने आपली भाषा सुधारते इतरांमध्ये वावरताना आपल्या वाचनातून मिळालेल्या माहितीचा आपण सहज वापर करू शकतो. भरपूर वाचन असलेला म्हणून इतरांवर सहज छाप पाडू शकतो

    वाचनामुळे आपल्याला जगभरातल्या घडामोडी कळतात. आपण बहुश्रुत होतो. वाचन एकट्या माणसास कधीच एकटे पडू देत नाही. प्रवासात कुणाची वाट बघत असताना, एकटे राहत असताना, दीर्घ आजारपणात आणि म्हातारपणी पुस्तक मित्रासारखी सोबत करतात.

वाचन करताना काय वाचावं? काहीही वाचावं, वर्तमानपत्र अग्रलेख सगळं काही वाचावं. आत्मचरित्र, चरित्र,ललित लेखन,कविता, नाटक, कथा,कादंबऱ्या, प्रवास वर्णन,व्यक्तिचित्रण सगळं वाचावं.जसजसं आपलं वाचन वाढत जातं तसं आपल्याला काय वाचावं आपली आवड काय आहे हे कळत जातं.

नकष्यधी ब्रह्मा लिखित ग्रंथ दूत मम तत्रेकदा लाकस्य नाभविण्यती सुभागती.

विधात्मा परमेश्वराने लिखित ग्रंथाचे मानवाला अपूर्व वरदान दिले आहे, ते नसते तर आजची हि सुखद आणि शुभ अवस्था त्याला लाभली नसती. म्हणून वाचन सर्व किंवा एक कला म्हणून जोपासली पाहिजे.कोणत्याही क्षेत्रात अद्ययावत रहायचे असेल आणि नवीन कौशल्य आत्मसात करायची असतील तर वाचनाला पर्याय नाही.

अनेक यशस्वी व्यक्ती आपल्या यशाचे श्रेय वाचनास देतात. आपल्या देशात पंडित जवाहरलाल नेहरू, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, यशवंतराव चव्हाण हे पट्टीचे वाचक होते. त्यांचे व्यक्तिगत संग्रह हे पन्नास हजारांपेक्षा जास्त होते.

अब्दुल कलाम म्हणत, मी माझी ग्रंथसंपदा हीच माझी सर्वात मोठी ठेव आहे आणि ग्रंथांत बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण सर्वात आनंदाचा व समाधानाचा आहे.

म्हणूनच प्रत्येकाने जशा अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा आहेत, तशाच वाचनही मूलभूत गरज समजून ती जोपासली पाहिजे.

लिप्यांतरकार : सुवर्णा जगताप (बडोदा) (jyotibagul50205@gmail.com)

हेमाद्री च्या पहिल्या अंकातील 'वचन एक गरज' या लेखाचे  लिप्यांतर सौ. सुवर्णा जगताप (बडोदा) यांनी करून पाठवलेले आहे...

हेमाद्री अंक-१ : लेख क्रमांक : ७, पान क्रमांक : २३ 

https://drive.google.com/file/d/17OMJG9MZ_3H_NRdNSr0IdMWVlMMC13Nr/view?usp=sharing


No comments:

Post a Comment